चंद्रभागेच्या तीरी पुराणांपासून बघितलं तर स्त्री रूपवान असेल, समाजातील खालच्या स्तरातील असेल तर तिच्याविषयी उलटसुलट चर्चांना नेहमीच उधाण येते.हे अगदी १५व्या शतकापासून ते आजतागायत चालत आलंय.कधी भवतालची परिस्थिती,कधी कौटुंबिक परिस्थिती तर कधी तिचे निर्णय या चर्चांना कारणीभूत ठरतात. आज आषाढीनिमित्त अशाच एका साध्वी स्त्रीचं स्मरण करूया. तिला खरं तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो.आपल्या भक्तीरूपी शक्तीने आपल्यावरील संकट तिने कसे थोपवले?कोण आहे ती देवत्वास पोहोचलेली स्त्री? आषाढीएकादशीनिमित्त वारकरी संप्रदाय पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर ,भक्तीरसात मग्न होऊन दाखल झालाय. अभंग, भजनं यांचा पाऊस पडतोय. या अभंगांची रचयती दिव्य, तेजःपुंज स्त्री ..जिचं नाव आहे कान्होपात्रा ..हो तिच वर उल्लेखलेली संत कान्होपात्रा. तिचं स्मरण तर करायलाच हवं ना!कान्होपात्राचा जन्म पंढरपुरातील सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढा इथे शामा नावाच्या गणिकेच्या पोटी झाला.जसजशी कान्होपात्रा लहानाची मोठी होऊ लागली तिचं रूप हा चर्चेचा विषय होऊ लागला.ऐषोआरामी आणि सुखोपभोगी वातावरणात कान्होपात्रा वाढत होती. तिच्या महालात स...