Posts

Showing posts from January, 2026

कथा -

Image
सोल मेट  डिअर हजबन्ड , आज मला पत्र लिहायचा मूड आलाय. कारण म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर बरंच काही.म्हणजे झालं असं…काल पुस्तकाच्या कपाटातून एक पत्र डोकावून बघत होतं..”लोकं लिहायला विसरली का नाती विसरली ?”,जुनं जीर्ण पिवळसर पत्र जणू मला विचारत होतं,“हल्ली माझा मीच झोपेत चालत असतो, जमलेली माझ्यावरची धूळ साफ करत असतो.पण तरी मोबाईल सारखा पाॅश दिसत नसतो;ओल्ड फॅशन वाटतो.”टपकन माझ्या डोळ्यातला पाण्याचा थेंब त्या पत्रावर पडला.पत्रांनी किती मैत्रिणी होत्या जोडल्या .किती आठवणी होत्या आपल्या या पत्रांत दडल्या. कसं सांगू पत्राला तुला नाही रे विसरले पण या मोबाईल मध्ये थोडी हरवले.म्हणून आज परत पत्र लिहायला बसले.आठवतात ना तू मला नि मी तुला लग्ना आधी लिहिलेली पत्रं.त्यावेळी मोबाईल तर नव्हताच पण लॅन्ड लाइन सुध्दा महाग वाटायचा.टेलिफोन बूथवरून करायचास तू कधीतरी फोन मला.त्यात तुझं डिफेन्स ट्रेनिंग. कडक शिस्तबद्ध. त्यामुळे फोनवरची काही मिनिटं तुझा आवाज ऐकून रडण्यात जायची.मग तू समजूत घालायचास.तुझी तब्येत बरी नसली तरी लपवत हसत बोलायचास. आपल्या दोघातलं अंतर खूप जाणवायचं फोनवर.पण पत्र लिहिताना अंतर कमी...

कथा- गत जन्म शोधताना भाग - १

Image
गत जन्म शोधताना लहान मुलींचा घोळका खेळत होता.त्यादिवशी संध्याकाळी नेमकी अमावस्या होती. दिवेलागणीला वेळ झाली होती पण पोरींचा लपंडावाचा खेळ चांगलाच रंगला होता.प्रियावर डाव होता.डोळ्यावर पट्टी बांधून ती लपलेल्या मैत्रिणींना शोधू लागली.मोकळं मैदान आणि पलीकडे पडकी काही घरे.तिथे सध्या कुणीच रहात नव्हतं.सुमारे  पंधरा मिनिटं बिचारी प्रिया शोधत  होती पण कुणीच मैत्रीण आऊट होईना.त्या झाडावर चढल्या होत्या .काही सिमेंट पाइपलाइन मध्ये लपल्या होत्या.प्रिया उलट्या दिशेने चालत चालत त्या पडक्या घरापर्यंत पोहोचली. प्रिया दारातून आत गेली. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आणि तिने घाबरून डोळ्यांवरची पट्टी काढली. पोरींचा हसण्याचा आवाज मंद ऐकू येत होता.एक जिना चढून प्रिया आवाजाच्या दिशेने जात होती.समोर तिला परकर पोलक्यातल्या दोघी तिघी पळत जाताना गायब झालेल्या दिसल्या.ओळखीच्या होत्या का त्या? पण नीट समोर का येत नव्हत्या? पुन्हा पैंजण वाजले कुणीतरी धावत होतं .प्रियाने पाहिलं एकजण खांबाआड लपून तिला खुणेने ये असं म्हणत होती.प्रिया भारावून पुढे पुढे चालत होती आणि तितक्यात तिच्या लपलेल्या मैत्रिणी मा...

कथा - वाडा चिरेबंदी

Image
कथा - वाडा चिरेबंदी रामू गड्याने तांबडं फुटताच वाड्याचा शिसवाचा दरवाजा उघडला. रखमाने वाड्यातील एक एक करून सारे कंदील मालवले.अंगण सारवून सडा घातला. विठू दुधाची धार काढायला गोठ्यातील गाईंकडे गेला.रखमा शेणगोठा आटोपून चूल पेटवतच होती तेवढ्यात सुशिलाबाईंनी चहासाठी आवाज दिला. सुशिलाबाईंची सकाळपासून गडबड चालू होती. गुरुपौर्णिमेचाउत्सव म्हणजे भक्तीचा लोट वहातअसे शिर्डीतील साईबाबांच्यादर्शनाला.सुशिलाबाईंसारख्या अतिशय साध्वी प्रेमळ माऊलीला साईबाबांच्या दर्शनाची आस लागली होती. सुधाकरराव काटे सुशीलाबाईंचे यजमान तलाठी होते.अधिकार आणि श्रीमंतीचा डौल त्यांच्यात नेहमी दिसे. राहत्याचा पूर्वजांचा वाडा अगदी छान जपला होता त्यांनी. दगडी बांधकाम, तुळशीवृंदावन, बाजूला शेतातून आलेली धान्याची पोती,अंगणात विहीर, माजघर  अशा पंधरा एक खोल्यांचा वाडा. शिर्डीपासून एक दोन किलोमीटर अंतर होतं राहता गावाचं. राहत्याच्या द्राक्षाच्या बागा त्यांच्याच मालकीच्या. सुख पाणी भरत होतं म्हणा ना वाड्यात. कमतरता होती एका गोष्टीची.ती म्हणजे पन्नाशी उलटली तरी सुशिलाबाई वारस देवू शकल्या नव्हत्या या वाड्याला.आता तर त्यांनी आशा सोडल...

कथा क्रमांक - ८ सोळावं वरीस

Image
 सोळावं वरीस मानसीचा केंद्रीय विद्यालयातील पहिलाच दिवस.नवीन नोकरीतील उत्साह ,विद्यार्थ्यांविषयी कुतूहल असं मनात संमिश्र भाव येत होते तिच्या. मानसी काहीशी कडक तरी शांत दिसणारी शिक्षिका होती.  तिला व्यक्तिमत्त्व खुलेल असं रहायला आवडे.पस्तीशीतील असूनही ही टीचर शाळेतील मुला मुलींची पटकन मैत्रीण बनली. अकरावी बारावीतील ही सोळा सतरा वर्षांची मुलं.यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळणार असतं.त्यामुळे मानसी पण अधिक मन लावून शिकवायची.  मानसीचा विषय होता भौतिकशास्त्र.विद्यार्थ्यांना हा कठीणच वाटायचा रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांच्यामानाने. इंजिनिअरिंगचं ध्येय असणारी काही हुशार मुलं होती तिच्या वर्गात. त्यातच “तो”ही होता…आदित्य.अतिशय हुशार, शांत आणि महत्वकांक्षी मुलगा. मानसीला खरं म्हणजे आदित्यच्या क्लासवर शिकवताना दडपण यायचं.आय.आय.टी.पातळीवरचे  प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी ही बॅच होती.त्यामुळे तिच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या होत्या.बोर्डात नव्व्याण्णव टक्केंच्यावर मार्क नक्की मिळवणार ही मुलं.आदित्य तर दहावीतही बोर्डात आला होता. त्यादिवशी बारावीची शाळेची चाचणी परीक्षा ...

कथा क्रमांक -५ ती

Image
                     ती शाळेतून आज बर्‍याच दिवसांनी मीनल वेळेत निघाली होती. बायोमेट्रिक पंच करून कार पार्किंग कडे वळणार तितक्यात तिला आठवी “अ”मधील प्रिया अजूनही शाळेच्या ग्राउंडवर रेंगाळलेली दिसली.मीनलने प्रियाला सायकल नाही आणली का आज? मी सोडून का घरी विचारताच प्रिया नको म्हणाली. मैत्रीण येतेय तिची वाट बघतेय असं सांगितल्यावर मीनल कार काढून निघाली खरी.पण तिच्या डोक्यातून प्रियाचा विचार काही केल्या जाईना.आणि मग एकदम मीनलला त्यादिवशीचा सायन्सचा पिरियड आठवला.त्यादिवशी घडलं असं की… ती सायन्स टीचर असल्याने तिने नेहमीप्रमाणेच ओ.एच.पी.वर स्लाइड्स दाखवत शिकवायला सुरुवात केली.कधी कधी स्मार्ट बोर्डावर शक्य नसेल पुरेशी माहिती  व स्पष्टीकरण तर प्रोजेक्टर वापरावा लागे.आजचा टाॅपीक होता “लाइफ प्रोसेसेस इन ह्यूमन बिइंग - 1) रिप्राॅडक्टशन स्लाईड वर गुणसूत्रे,पुरूष स्त्री अवयवांचे जीवशास्त्रीय विश्लेषण सुरू होते.वर्गातील मुले मुलींकडे बघून हसत होती. कमेंट्स पास करत होती.मुली काहीशा अवघडून लेक्चर ऐकत होत्या.त्यातील एका ग्रुपकडे मीनलचं लक्ष सतत जात...

कथा ४ - विटाळ

Image
                    कथा ४ - विटाळ  गौरीगणपतीचा सण आणि काही केल्या पाऊस काही उघडत नव्हता.कोकणातला पाऊस दारिद्र्याने पिचलेल्या माणसाला सवयीचा झाला होता.पावसाची भीती फक्त तुम्हाआम्हालाच.या पावसातही वेंगुर्ल्यातील घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होती. पार्वती आजींची लेक, नातू , जावई खास गणपतीकरता मुंबईहून आले होते वेंगुर्ल्यात. पार्वती आजी चुलीपाशी न्याहारीची तयारी करत होत्या. एकीकडे चहासाठी आधण ठेवलेले होते.सूनबाई देवपूजेसाठी बागेत फुलं आणायला गेली ती एक तास झाला तरी परतली नव्हती. मुलगा कालचा रात्रपाळीच्या ड्यूटीवरून आला नव्हता.इकडं ओढ्याचं पाणी वाढत चाललं होतं. तेवढ्यात पार्वती आजींची सून केतकी आली.आजींच्या नातवाने मामी आलीऽऽ म्हणून घरात वर्दी दिली.थोडी भिजली होती केतकी पावसात.आजी ओरडल्या केतकीला, “आज दुपारी जेवणं आटोपली की गणपतीची आरास करायला घ्या गं.पुरुष माणसं गणेशाची मूर्ती संध्याकाळी घेऊन यायचीत.न्याहारी आटोपून स्वयंपाकाला लागू. तिघीजणी बायका मिळून पटापट आवरू.”आजींचा उत्साह ओसंडून वहात होता.केतकी दारापाशी तशीच उभी होती.आज...

कथा३ - बकुळीचा गजरा

Image
बकुळीचा गजरा   थकलीस का ग कुसुम? जेव्हा आजी नातवांना खाली स्कूल बसपाशी सोडून आल्या तेव्हा नानांनी आपल्या बायकोला विचारलं. आजींनी हसून मानेनेच नाही म्हटलं. घर रिकामं झालं होतं.अकरा वाजेपर्यंत नुसती गडबड. सून, मुलगा दोघांची ऑफीसात जायची तयारी.त्यात नातू आणि नात हायस्कूलात आता त्यामुळे वाढलेला अभ्यास. त्यांची तयारी,डबे.सगळ्या कामांना बाई होती .त्यामुळे कुसूम आजी आणि नानांना तो भार पडायचा नाही.पण आताशा दोन बेडरूम फ्लॅट लहान पडू लागला होता. मुलांना अभ्यासाकरता स्वतंत्र खोली असणं गरजेचं झालं होतं.त्यामुळे सून मुलगा यांत रविवारी वरचेवर हल्ली वाद होत.घरातील शांतता लोपली होती.नोकरी असूनही दोघांची मुंबईत मोठं घर घेणं अशक्य होतं.त्यात मुलांच्या ट्यूशन्सची अमाप फी,महिन्याचा खर्च, आजी आजोबांची औषधं अवघड होत चाललं होतं.हे कुसूम आजी आणि नानांना स्पष्ट दिसत होतं. आपलं ओझं होऊ लागलंय किंवा आपली अडचण आपल्या मुलाच्या संसारात होतेय असं त्यांना जाणवू लागलं.आणि म्हणूनच गेले कित्येक दिवस चाललेल्या या ओढाताणीला त्यांनी पूर्णविराम दिला होता.अगदी कोणालाही न कळू देता काळजावर दगड ठेवून एक निर्णय ...

कथा २ - ऋणानुबंध

Image
 कथा - ऋणानुबंध  हुश्श…लागलं एकदाचं घर.नवीन शहर,भाडेतत्त्वावर घेतलेलं घर, अनोळखी लोकं. त्यात मला नुकताच चवथा महिना सुरु झालेला.गायनॅकॉलॉजिस्ट शोधण्यापासून सुरुवात.प्रचंड दडपण आलेलं.घरकामाला मोलकरीण शोधणे ,मोठीची नवीन शाळेत ॲडमिशन घेणे हैराण झाले असताना दमून रात्री लगेचच झोप लागली. सकाळी डोअर बेल वाजल्याने जाग आली.दारात एक तिशीतली बाई उभी होती.”तुमी नवीन आल्यात ना हिथं? मी कामच हुडकंत व्हते ताई.”सुनिता नाव होतं तिचं.माझ्या घराच्या जवळच रहात होती. चक्क अंबाबाईने माझं ऐकलं.माझी मदतनीस पाठवली होती.लगेच मी सुनिताला कामाला लावून घेतलं. सुनिताचं काम एकदम चोख होतं. आपलंच घर समजून काम करायची. लहान तीन मुलगे तिला.नवरा हिच्याच कमाईवर होता.तरी हिच्यावर पाळत ठेवायचा.” लई संशय घेतो ताई .घरी जायला कधी उशीर झाला तर पोत्यात बांधून राधानगरीच्या धरणात सोडून देईन म्हणतो ताई”  माझं मन सुनिताच्या गोष्टी ऐकून गलबलून येई.मी म्हणायची तिला आम्ही इथून गेलो की तू पण आमच्याबरोबर कोल्हापूर सोडून आमच्या गावी चलशील. ती कसनुसं हसत कामाला लागे. सुनिताच्या हाताला चव होती.मला आणि होणाऱ्या बाळाला त्रास होणार...
Image
 कथा क्रमांक १. रात्र तिला फाटकाचा आवाज आल्यासारखं वाटलं.कोण आलं असेल एवढ्या रात्री? किती वाजले म्हणून तिने घड्याळात पाहिले मध्यरात्रीचे दोन वाजले होते.नवरा म्हणाला झोप गं.शेजारी आलं असेल कोणी .उशीराच्या फ्लाईटने असेल. ह्म्म! असं म्हणून ती झोपली खरी पण मन अस्वस्थ होतं.दोन तासाने असावं साधारण कुणीतरी जोरजोरात परत फाटक वाजवत होतं.आता मात्र ती उठलीच.दिवा लावला.नवराही उठला.खाली जाऊन दरवाजा उघडून अंगणात येऊन बघताहेत तर बाबा फाटकाच्या बाहेरच्या बाजूस घराबाहेर होते.ती दोघंही चक्रावून असं कसं झालं म्हणाले. फाटकाचं कुलूप काढत बाबांना आत घेतलं.दोघांनी बाबांना आत घरात आणलं.नेमकं काय झालं, तुम्ही घराबाहेर गेटवरून उडी मारून का गेलात बाबा? मधुरा रडवेली होऊन त्र्याण्णव वर्षांच्या वडीलांना विचारत होती.वडीलांना काहीच आठवत नव्हते.मधुराची आई पंधरावर्षांपूर्वीच गेली होती.भावाचा डिवोर्स झाला होता.तो एकटा लक्ष देत होता दिवसा.पण या घटनेनंतर दुसर्‍या दिवशीपासून रात्रीचा ब्युरोमधून माणूस येऊ लागला.तो रात्रभर झोपे. दुसर्‍या दिवशी आंघोळ घालून मग जाई.पण मधुराचे वडील त्याला जुमानत नव्हते.दिवस रात्र वेळा त्यांन...